वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान!
लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी.
या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.