२३ गंभीर घरफोड्यांचा उलगडा; अंतरजिल्हा कुख्यात टोळीचे ४ आरोपी जेरबंद

*स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी*

     लातूर, दि.९ (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडी आणि चोऱ्यांच्या मालिकेने नागरिक हैराण झाले होते. विविध ठिकाणी सलगपणे घडणाऱ्या या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने स्वतंत्र मोहीम राबवली होती. या मोहिमेत अखेर मोठे यश मिळत, अंतरजिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या कुख्यात घरफोड्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीतील चार संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

३ वर्षांपासून सक्रिय, २३ गंभीर घरफोड्या उघडकीस

अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील तब्बल २३ गंभीर घरफोड्यांचे गुन्हे उघड झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली अशा एकूण ₹४,३९,००० इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वैज्ञानिक तपासामुळे मिळाला धागा

गुन्ह्यांची मालिका सुरू असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, फूट-प्रिंट्स, स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे संशयितांची माहिती मिळवून पोलिसांनी जाळं पसरवले.
६ डिसेंबर रोजी लातूर-बाशीर रोडवरील टी-पॉइंट परिसरात संशयित दिसताच त्यांना सापळा लावून पकडण्यात आले.

अटक केलेले आरोपी

  1. अजय श्रावण शिंदे (वय २२, रा. सुभा, ता. धाराशीव)
  2. अर्जुन दिलीप भोसलें (रा. धाराशीव) वय  २७ रा. भिवंडी)झरेगाव जिल्हा सोलापूर,
  3. केशव माणिक पवार वय 30 राहणार खंडाळा ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव,
  4.  विक्की सजगुर्या शिंदे वय 19 रा. सुंभा, जि. धाराशिव यांना अटक करण्यात आली आहे.

या सर्वांची कसून चौकशी केली असता घरफोड्यांचे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.

घरफोड्यांचा खुलासा – लाखो रुपये किमतीचा माल जप्त

अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढीलप्रमाणे माल हस्तगत केला—

  • सोन्याचे दागिने
  • चांदीचे दागिने
  • दोन मोटारसायकली
  • एकूण मालमत्ता किंमत : ₹४,३९,०००

त्याचबरोबर, विविध घरफोड्यांमध्ये मिळालेली ₹३०,००० रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

७० हून अधिक गुन्ह्यांचा तपास जलद गतीने

अंतरजिल्हा टोळी विविध जिल्ह्यांमध्ये सक्रिय असून या आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. धाराशीव ग्रामीण, मंथन, मुदखेड, बिदर यांसारख्या परिसरांतही त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील ७० हून अधिक प्रलंबित घरफोडी गुन्ह्यांच्या तपासाला चालना मिळाली असून पोलिसांनी या गुन्हेगारी साखळीचा भक्कम उलगडा केला आहे.

विशेष पथकाचे कौतुक

या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमूल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपूर्व पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वैज्ञानिक तपास पद्धतचा वापर करून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला. या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली. यामध्ये संपूर्ण दयानंद भुजबळ, अमित कुमार पुणेकर, राजाभाऊ घाडगे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांच्यासह बाधा मुरूड येथील पोलीस अधिकारी यांचा सहभाग होता.अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या तपासामुळे मोठ्या टोळीला जेरबंद करण्यात आले, याबद्दल सर्वत्र या पथकाचे कौतुक होत आहे.


लातूर जिल्ह्यात घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. या यशस्वी मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून पुढील काळात अशा घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर