जयपूरमध्ये पार पडलेल्या ग्रँड फायनलमध्ये रनर-अपचा बहुमान; महाराष्ट्राचे केले प्रभावी प्रतिनिधित्व* लातूर, दि. २३(प्रतिनिधी) : जयपूर येथील झी स्टुडिओमध्ये दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया (FSIA) 2025’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत लातूरची कन्या शिवानी हिने उल्लेखनीय यश संपादन करत रनर-अप (द्वितीय क्रमांक) हा मान पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा नावलौकिक देशपातळीवर झाला आहे. या भव्य ग्रँड फायनलमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवड झालेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्या सर्वांमध्ये आपली वेगळी छाप पाडत शिवानीने महाराष्ट्र राज्याचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता आणि भारतीय संस्कृतीचे सुसंस्कृत दर्शन घडवत तिने परीक्षकांची विशेष दाद मिळवली. शिवानी ही VDGMC (विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), लातूर येथे एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असून, वैद्यकीय शिक्षणासोबतच कला, संस्कृती व...
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : मुंबई येथील शिवसेना भवनात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी उपस्थिती दर्शविली. या वेळी एकूणच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित राहून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी पुरस्कारप्राप्त सर्व व्यक्तींना महिन्याला वीस हजार रुपयांचे मानधन देण्यास मान्यता दिली असल्याचे जाहीर केले. तसेच, या सर्वच पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात समाज नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अॅड. वैजनाथ वाघमारे यांनीही आपले मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य केल्या असून त्या तातडीने अंमलात आणल्या जातील. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना हा सोहळा गौरवाचा क्षण ठरला. कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, पुढील कार्यकारिणी बैठक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे आ...
अहिल्यानगर, ( प्रतिनिधी ) दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेला अहिल्यानगर मेळावा हा समाज बंधुभगिनींच्या ऐक्याचे आणि प्रबळ संघटनेचे दर्शन घडवणारा ठरला. या मेळाव्याने यशाच्या पायरीवर मोठे पाऊल टाकले असून, आता फक्त मानधन व प्रवासाच्या सोयीची अंमलबजावणी हा अंतिम टप्पा शिल्लक आहे. या मेळाव्याच्या यशामध्ये मा. ॲड. वैजनाथ वाघमारे यांच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि जबरदस्त नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. समाजातील विविध स्तरांतील पुरस्कारार्थींनी एकत्र येऊन या मेळाव्याला ऐतिहासिक बनवले. पुरस्कारार्थींनी व्यक्त केले की, “आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सवलती देणाऱ्या हातात समाजसेवेचे आणि जनकल्याणाचे सामर्थ्य आहे. त्यांनी राजकारणापेक्षा सामाजिक सेवेला अधिक प्राधान्य दिले आहे, हे आम्हा सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.” मेळाव्यात उपस्थित वक्त्यांनी पुढे सांगितले की, “महामानवाच्या नावाने आम्हाला दिलेल्या पुरस्काराचा आम्हाला अभिमान आहे. या पुरस्कारामागे कोणताही भेदभाव नाही. ज्यांच्या नावाने आम्हाला सन्मान मिळाला, त...